'मोह -'

भुलवले मन किती
टिमटिमणाऱ्या ताऱ्यांनी ..

झुलवले तन कसे
टपटपणाऱ्या प्राजक्तफुलांनी ..

हरवले क्षण किती
हुरहुरणाऱ्या त्या आठवणीतुनी ..

फिरवले मन कसे
झरझर त्या निसर्गसृष्टीतुनी ..


ठरवले किती जरी
वरवर रहायचे हे आज दुर्लक्षुनी .. !

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा