निरोप


सागरतीरी जोडा अपुला

हात घेउनी हाती बसला -

निरोप घेताक्षणी सखे
विचारलेस तू का ग मला -

"भेट ही शेवटची अपुली ,
वाईट वाटते काय तुला" -

बरे वाटले होते मजला
कारण सागर तो साक्षीला -

दु:ख जाहले किती मला
कसे ग सांगू सखे तुला -


जाणिव होताच सागराला

जवळ निरोपाचा क्षण आला -

अश्रूंच्या त्या लाटेमध्ये
माझे अश्रू मिसळुन आला . .
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा